"This news portal adheres to the Digital Media Ethics Code, 2021, established under the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021, notified by the Ministry of Information and Broadcasting (MIB). Furthermore, it ensures compliance by submitting mandatory monthly reports to the government as stipulated.

आर्थिक

सुरगाणा तालुक्यातील,नागरिकांचा पुरात जीवघेणा प्रवास.

विद्यार्थ्यांना पुराच्या पाण्यातून शाळेचा प्रवास करावा लागत आहे.

सुरगाणा; नाशिक जिल्ह्यात आजही अनेक भागात नदीवर पुलच नसल्याने नागरिकांना पुरात जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. सुरगाणा तालुक्यातील सावरपाडा येथील केटी बंधाऱ्यावरून पुराचे पाणी जात असल्याने येथील विद्यार्थ्यांना पुराच्या पाण्यातून शाळेचा प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, पेठ आदिवासी तालुक्यातील असुविधांचे भीषण वास्तव समोर आले आहे.

एकीकडे सुरगाणा तालुक्यात यंदाच्या पावसाळ्यात बिकट परिस्थिती निर्माण झालेली पाहायला मिळाली. पहिल्याच पावसात रस्ते खचले, पूल पाण्याखाली गेले, अनेक गावांचा संपर्क तुटला, अलंगुन गावात पुराचे पाणी आले. यामुळे अनेक भागात आजही पुरपरिस्थिती असून नागरिकांना ये जा करण्यासाठी कसरत करावी लागत आहे. सुरगाणा तालुक्यातील भेगू सावरपाडा येथील विद्यार्थ्यांना शाळेत येण्या जाण्यासाठी केटीवेअर प्रवास करावा लागत आहे. सध्या या केटीवरून पुराचे पाणी जात असताना अशा प्रकारचा जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.सुरगाणा तालुका निसर्ग सौंर्दयाने बहरून गेलेला परिसर. मात्र या निसर्ग सौंदर्यामागे येथील नागरिकांच्या पायाभूत सुविधा कुठेच दिसत नाहीत. आजही रस्ते, पाणी, आरोग्य यासारख्या पायाभूत सुविधांचा या ठिकाणी वाणवा आहे. म्हणजे अनेकदा रुग्णांना नेण्यासाठी रुग्णवाहिका तर नाहीच नाही मात्र रस्ते नसल्याने डोली करून दवाखान्यात न्यावे लागते. पावसाळयात रस्ते नसल्याने पुराच्या पाण्यातून प्रवास करावा लागतो. तर कधी रस्ते खचल्याने संपर्कच तुटतो. यंदाच्या पावसाळ्यात अनेक ठिकाणी रस्ते खचल्याच्या घटना समोर आल्या. यामुळे आरोग्य व्यवस्थेचा प्रश्न पुढे आला. एकूणच तालुक्यातील पायाभूत सुविधांची परिस्थिती अत्यंत दयनीय अवस्थेत आहे.दरम्यान सुरगाणा तालुक्यातील भेगू सावरपाडा परिसरात नागरिकांसह विद्यार्थ्यांना केटीवरून ये जा करावी लागत आहे. या ठिकाणी कळमणे, भेगू, सावरपाडा, मदळपाडा, खिरमाणी अशी गावे असून यांचा इतर गावांशी सपंर्क तुटला आहे. मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते. शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ये-जा करण्यासाठी पूल होणे आवश्यक आहे. पूल नसल्याने विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतण्याची परिस्थिती आहे. त्यामुळे शासनाने योग्य ती दखल घेऊन या ठिकाणी पूल बांधण्यात यावा, तसेच शाळेतील विद्यार्थ्यांसाठी योग्य उपाययोजना करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.यंदाच्या पावसाळ्यात सुरगाणा तालुक्यातील अत्यंत भीषण परिस्थितीला सामोरे जावे लागले. अनेक भागात पूर आल्याने संपर्क तुटला, आरोग्य व्यवस्था खोळंबली. पिण्याच्या पाण्याचे तीन तेरा वाजले. आता शाळा सुरु झाली तर विद्यार्थ्यांना ये जा करण्यासाठी पुलच नाही.

जीवघेणी कसरत करून पुराच्या पाण्यातून प्रवास करण्याची वेळ विद्यार्थ्यांसह नागरिकांवर आली आहे. त्यामुळे संबंधित तालुका, जिल्हा प्रशासन पायाभूत सुविधांसाठी नेमकं काय करतंय असा सवाल उपस्थित होत आहे. शिवाय अलीकडच्या काळात लोकप्रतिनिधी मतांचा जोगवा मागण्याशिवाय स्थानिक पातळीवर कामे करतात का? असाही प्रश्न या निमित्ताने होतो आहे

🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻८२०८३०८७८७

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!