आरोग्य

संतपेठ परिसरातील शाळा नं. ७ पाठीमागील परिसरात घाणीचे साम्राज्य न.प. अंतर्गत गटारी उघड्या… कोणाचा तरी जीव गेल्यावर नगरपालिका देणार का लक्ष ?

. पंढरपूर प्रतिनिधी

संतपेठ येथील शाळा नं. ७ मागील परिसरातील पंढरपूर न.प. अंतर्गत गटारी बंदिस्त करण्याबाबत येथील नागरिकांनी वारंवार नगरपालिकेशी पत्रव्यवहार करुनसुद्धा नगरपालिकेने कोणत्याही प्रकारची कार्यवाही केलेली नाही. गेल्या अनेक वर्षांपासून संतपेठ शाळा नं. ७ मागील परिसरामधील रमाई नगर व गोपाळपूर रोड, शाळा नं. ७ ते पाण्याची टाकी अंतर्गत कोणतेही काम पूर्ण झाले नाही. तरी उघड्या गटारी असल्यामुळे जेष्ठ नागरिकांना, स्त्रियांना, लहान शाळकरी मुलांना या गोष्टीचा प्रचंड त्रास होत आहे. रात्री अपरात्री यामध्ये पडून मोठा अपघात होऊन जीवीत हानी होण्याचा धोकाही टाळता येऊ शकत नाही.  गेल्या काही वर्षांपासून या गटारांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे असे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे. तसेच या गटारी उघड्या असून त्यामध्ये अतिशय घाण साचली असून त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव देखिल वाढला आहे यामुळे डेंग्यू, मलेरिया चे डासांमुळे नागरिकांना या रोगांना बळी पडण्याची संख्या देखील या भागात वाढली आहे. तरी नगरपालिका कोणाचा जीव गेल्यावर या गोष्टीवर लक्ष देणार का? अशी विचारणा या भागातील नागरिकांकडून होत आहे.  याच परिसरामध्ये देशाची सेवा करणारे नाईकनवरे यांचे देखिल निवासस्थान आहे. त्यांना देखिल या गोष्टीचा प्रचंड नाहक त्रास सहन करावा लागत आहे.चौकट – न.पा. अधिकाऱ्यांना समक्ष भेटून फोन वरुन संवाद साधून पण कोणतीच दखल घेतली जात नाही यामुळे नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. जर देशाची सेवा करणाऱ्या जवानांना न्याय मिळत नसेल तर सर्वसामान्य नागरिकांचे काय हाल होत असतील? याचा विचार नाही केलेलाच बरा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!