सामाजिक

खादी ने आत्मनिर्भर भारत अभियानाला दिली नवी दिशा-केंद्रीय खादी आणि ग्रामोद्योग अध्यक्ष मनोज कुमार

पंढरपूर प्रतिनिधी

नव्या भारताची नवीन खादी’ ने ‘आत्मनिर्भर भारत अभियाना’ला नवी दिशा दिली असून, गेल्या 9 वर्षात खादी उत्पादनांच्या विक्रीत चार पटीने वाढ झाल्याने ग्रामीण भारतातील कारागीर आर्थिकदृष्ट्या समृद्ध झाले असल्याचे केंद्रीय खादी आणि ग्रामोद्योग आयोग, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचे, अध्यक्ष मनोज कुमार यांनी सांगितले

पंढरपूर येथे खादी व ग्रामोद्योग आयोग आणि ना. रामदास आठवले युवामंच संस्थेच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ग्रामोद्योग विकास योजनेतंर्गत राज्यातील विविध जिल्ह्यातून आलेल्या 180 लाभार्थ्यांना मधुमक्षिका पालन पेटी, स्वयंचलित अगरबत्ती बनविण्याची मशीन तसेच विद्युत चलित चाकाचे वाटप अध्यक्ष मनोज कुमार यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे केंद्रीय संचालक विजय श्रीधरण, राज्य निदेशक योगेश भांबरे, सहायक निदेशक सुनील वीर, अरुण यादव, उमाकांत डोईफोडे, भैरवनाथ शुगरचे चेअरमन प्रा. शिवाजी सावंत, ना. रामदास आठवले युवामंच संस्थेचे अध्यक्ष दिपक चंदनशिवे यांच्यासह नागरिक तसेच लाभार्थी उपस्थित होते

यावेळी बोलताना श्री मनोज कुमार म्हणाले, आत्मनिर्भर भारताचे” स्वप्न साकार करण्यासाठी लघु आणि सूक्ष्म उद्योगांची मोठ्या प्रमाणावर स्थापन करण्याला तसेच खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या विविध योजनांद्वारे स्वयंरोजगार निर्माण करून स्वावलंबी भारत निर्माण करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. ‘वोकल फॉर लोकल’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ मंत्रामुळे खादीला जागतिक व्यासपीठावर ओळख मिळाली आहे. गेल्या 9 वर्षात खादी आणि ग्रामोद्योग उत्पादनांच्या उलाढालीने 1 कोटी 34 लाख रुपयांचा आकडा ओलांडला आहे, तर या काळात 9 लाख 50 हजारांहून अधिक नवीन नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत. खादी व ग्रामोद्योग आयोग ग्रामीण भारताच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. ग्रामोद्योग विकास योजनेतंर्गत आतापर्यंत 27 हजारांहून अधिक कुंभार समाजातील बंधू-भगिनींना विद्युत चलित चाकाचे वाटप केले आहे, यामुळे त्यांच्या व्यवसायला गती मिळाली आहे. तसेच या योजनेंतर्गत 6000 हून अधिक टूलकिट्स आणि यंत्रसामग्रीचे वाटप करण्यात आले आहे, तर मध अभियान योजनेंतर्गत आतापर्यंत 20 हजार लाभार्थ्यांना 2 लाखांहून अधिक मधमाशांच्या पेट्या आणि मधमाश्यांच्या वसाहतींचे वाटप करण्यात आले आहे सध्या देशभरात 3 हजारांहून अधिक खादी संस्था कार्यरत आहेत, ज्याद्वारे 5 लाखांहून अधिक खादी कारागीर आणि कामगारांना रोजगार मिळत आहे. महाराष्ट्रातील 31 खादी संस्थांच्या माध्यमातून 1 हजार 400 हून अधिक कारागिरांना रोजगार मिळत आहे. गेल्या आर्थिक वर्षात येथील 60 खादी आऊटलेट्सवर 26 कोटींहून अधिक खादीची विक्री झाली आहे. पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या माध्यमातून खादी आणि ग्रामोद्योग आयोग ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत आहे. गेल्या 8 वर्षांत पीएमईजीपीच्या माध्यमातून महाराष्ट्रात 26 हजार 375 नवीन युनिट्सची स्थापना करण्यात आली आहे, ज्यासाठी भारत सरकारने सुमारे 802 कोटी 51 लाख रुपयांची मार्जिन मनी अनुदान वितरित केले आहे. या नवीन युनिट्सच्या माध्यमातून महाराष्ट्रात 2 लाख 11 हजार नवीन नोकऱ्या निर्माण झाल्या असल्याचे श्री मनोज कुमार यांनी सांगितले यावेळी पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत महाराष्ट्र, गुजरात, गोवा आणि दादरा आणि नगर हवेली येथील 226 युनिटची स्थापना करण्यात येणार असून त्यांना 9 कोटी 7 लाख रुपयाचे मार्जिन मनी अनुदान अध्यक्ष मनोज कुमार यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने वितरीत करण्यात आले. यामध्ये 2 हजार 486 जणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. खादी-ग्रामोद्योग कार्यक्रमाशी संबंधित कामगारांच्या हातात जास्तीत जास्त पैसा देण्याचा, त्यांच्या उत्पन्नाचा स्रोत वाढवून त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी स्वदेशी उत्पादनाची खरेदी करावी तसेच विक्रेत्यांनी देशात उत्पादीत झालेल्या मालाची विक्री करावी असे आवाहन खादी आणि ग्रामोद्योग आयोग, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचे, अध्यक्ष मनोज कुमार यांनी केले आहे.

🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ☎️९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻☎️८२०८३०८७८७📧 lakhansalunkhe75@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!