शैक्षणिक

दहावी – बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेसंदर्भात ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन

महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंचच्या विद्यार्थी आघाडीचा उपक्रम

24 मराठी न्युज मुख्य संपादक श्री लखन साळुंखे


महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंचच्या विद्यार्थी आघाडीचा उपक्रम
पंढरपूर – महाराष्ट्रातील बारावीच्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा ४ मार्च पासून तर दहावीच्या विद्यार्थ्यांच्या लेखी परीक्षा १५ मार्च पासून सुरू होत आहेत. सध्या कोव्हीड १९ जागतिक महामारीबाबतचे निर्बंध शासन हळूहळू शिथिल करत असल्याने ही परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. या परीक्षांना सामोरे जाताना विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी कोणत्या पद्धतीने दक्षता घ्यावी. विद्यार्थ्यांनी मानसिक व शारीरिक स्वास्थ टिकवून ठेवून परीक्षांमध्ये उत्तुंग यश संपादन करावे. या उद्देशाने महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंचच्या विद्यार्थी आघाडीने ऑनलाईन पद्धतीने व्याख्यानाचे आयोजन केले आहे. या व्याख्यानात सातारा येथील छत्रपती शिवाजी कॉलेजचे मानसशास्त्र विभाग प्रमुख डॉ. गणेश लोखंडे हे मार्गदर्शन करणार आहेत. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी मधू शिंदे हे असणार आहेत. हा कार्यक्रम रविवार दि. २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७:०० वाजता संघटनेच्या यु-ट्यूब चॅनेल वरती पाहता येणार आहे. तरी महाराष्ट्रातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. असे आवाहन विद्यार्थी आघाडीचे प्रदेश अध्यक्ष डॉ. दत्ताजीराव डांगे यांनी केले आहे.
…………………………………………………………………………………………………………………………………………………………………

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!